शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

जयंतरावांच्या पुत्रांची राजकीय मशागत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:10 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : इस्लामपूर मतदार संघात घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर असतानाच, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांचे दोन्ही पुत्र प्रतीक आणि राजवर्धन पाटील यांनी राजकीय मशागतीला सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार जयंत पाटील यांनी दोघा मुलांना तालुक्यात संपर्कासाठी आणले आहे. त्यांच्या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी व ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : इस्लामपूर मतदार संघात घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर असतानाच, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांचे दोन्ही पुत्र प्रतीक आणि राजवर्धन पाटील यांनी राजकीय मशागतीला सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार जयंत पाटील यांनी दोघा मुलांना तालुक्यात संपर्कासाठी आणले आहे. त्यांच्या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी व राजारामबापू उद्योग समूहातील पदाधिकाºयांची रेलचेल दिसते.इस्लामपूर मतदार संघात घराणेशाहीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राजारामबापू पाटील यांच्यापासून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलापर्यंत घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आला आहे. राजारामबापू यांच्या पश्चात अचानक जयंत पाटील यांना राजकारणात यावे लागले. हीच परंपरा पुढे आली असून जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक आणि राजवर्धन यांनीही गेल्या वर्षभरात इस्लामपूर मतदार संघात राजारामबापू उद्योग समूहात लक्ष केंद्रित केले आहे. या दोघांच्याही प्रसिध्दीसाठी राष्ट्रवादी व उद्योग समूहातील पदाधिकाºयांत चांगलीच रेलचेल सुरू आहे.माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचाही राजकीय वारसा त्यांचे पुत्र अ‍ॅड. चिमण व विश्वास डांगे यांनी जोपासला आहे. चिमण डांगे यांनी नगरसेवक, नगराध्यक्षपद भूषविले आहे. त्यांचे बंधूही पालिकेच्या राजकारणात सक्रिय आहेत. माजी आमदार विलासराव शिंदे यांनीही राष्ट्रवादीची धुरा सक्षमपणे पेलली आहे. त्यांचेही पुत्र वैभव शिंदे आणि विशाल शिंदे हे राजकीय पटलावर कार्यरत आहेत. वैभव शिंदे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.इस्लामपूर मतदार संघात वाळव्याच्या हुतात्मा संकुलाचे राजकारण चांगलेच चर्चेत असते. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पश्चात त्यांचे पुत्र वैभव नायकवडी, स्नुषा सुषमा नायकवडी, नातू गौरव नायकवडी आपापल्यापरीने राजकारणात स्थिरावले आहेत. परंतु त्यांनी अद्याप कोणत्याही पक्षाला जवळ केलेले नाही. तेथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांचेही पुत्र संग्राम पाटील यांची नुकतीच वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर निवड झाली आहे.अशीच परिस्थिती पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक यांची आहे. त्यांचे दोन्ही पुत्र राजकारणात सक्रिय आहेत. दोघांनीही सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. राहुल इस्लामपूर, तर सम्राट शिराळा मतदार संघातून चाचपणी करत आहेत. शेतकरी चळवळीतील उदयास आलेल्या सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळाले आणि त्यांचा मुलगा सागर खोत यांच्या राजकीय घरणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला होता.एकूणच वाळवा तालुक्यात मातब्बर नेत्यांच्या वारसदारांचीच चलती आहे. आता प्रतीक व राजवर्धन तालुक्यात सक्रिय झाल्यामुळे जयंत पाटील यांना आणखी बळ मिळणार आहे.कार्यकर्त्यांचे प्रेम...प्रतीक व राजवर्धन यांच्याकडे अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस अथवा राजारामबापू समूहातील कोणतीही जबाबदारी नसली तरी, तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून जयंत पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना यापूर्वीच स्वीकारले आहे. मतदार संघात विविध ठिकाणच्या दौºयावेळी जयंत पाटील यांना मानणारे कार्यकर्ते दोघांवरही प्रेम व्यक्त करताना दिसतात.